<p style="text-align: justify;"><strong>Majha Maharashtra Majha Vision 2021 : </strong>देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे, असं आपलं व्हिजन मांडताना नितीन गडकरी म्हणाले. तसेच राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील, असं केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.</p> <p style="text-align: justify;">"देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते अनेक देशभक्तांच्या बलिदानातून मिळालं. हा इतिहास रक्त्याच्या थारोळातून, घामाच्या, बलिदानाच्या आणि परिश्रमाच्या थेंबातून लिहिला गेला आहे. त्यामुळे त्याची जाणीव ठेवत त्यांना अभिवादन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपण पंच्याहत्तरीत पदार्पण करत आहोत. आपल्याला आत्मनिर्बर भारत बनवायचाय, असं आपलं सर्वांचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरता सुखी, संपन्न, समृद्ध महाराष्ट्र व्हावा, हिदेखील आपल्या सर्वांच्या मनातील भावना आहे. देशाचा विकास करायचा असेल, तर गरीबी दूर झाली पाहिजे, गरिबी दूर करण्यासाठी रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे. तसेच रोजगात निर्माण करण्यासाठी शेती आणि उद्योग क्षेत्राची प्रगती आणि विकास केला पाहिजे.", असं नितीन गडकरी म्हणाले. "महाराष्ट्र हे निर्यातीमध्ये आघाडीवर असणारं राज्य आहे. त्यामुळे निर्यात वाढून जास्तीत जास्त इनकम महाराष्ट्राला मिळावं यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे राज्यात आर्थिक समृद्धी येईल.", असंही ते म्हणाले. </p> <p style="text-align: justify;">"राज्यातील कळीचा मुद्दा आहे पाणी. मी जलसंपदा मंत्री होतो, त्यावेळी मी 40 हजार कोटी महाराष्ट्राला दिले. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग, कोकणातील, विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी भाग याठिकाणी आपल्याला सिंचनाच्या सुविधा वाढवाव्या लागतील. आज राज्यात सिंचनाचं प्रमाण 22 टक्क्यांवर आहे. पण आपल्याला जलसंवर्धनाच्या मार्गातून आणि त्याचबरोबर सिंचन प्रकल्प वाढवून राज्यातील सिंचनाचं प्रमाण 50 टक्क्यांच्या वर नेणं गरजेचं आहे. हे केल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र सुखी-समृद्ध होणार नाही.", असंही ते म्हणाले. </p> <p style="text-align: justify;">"समृद्धी महामार्गाच्या बाजूनं मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर 25 ते 30 लाखांची नवी पाच शहरं विकसित करण्याची आवश्यकता आहे. या शहरांना रेल्वे स्थानक, विमानतळं निर्माण करण्याची गरज आहे. त्याकरता अनेक चांगल्या जागा आणि लोकेशन्स आहेत. कारण आपल्याला आवडो किंवा न आवडो हळूहळू शहरीकरण होत आहे. त्यामुळे जागा उपलब्ध नाही, यामुळे अनेक नव्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर जे टू-टायर सिटी आहेत, त्याचा विकास करणं गरजेचं आहे.", असं नितीन गडकरी म्हणाले.</p> <p style="text-align: justify;"><strong>पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार : नितीन गडकरी </strong></p> <p style="text-align: justify;">एबीपी माझाचा कार्यक्रम माझा महाराष्ट्र, माझा व्हिजनमध्ये बोलताना नितीन गडकरींनी मोठी घोषणाही केली. "सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळेदेखील आपण आपलं प्रदूषण कमी करु. आपण इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर करण्याची गरज आहे. पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा सातत्यानं आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोल पंपांचं उद्घाटनही केलं आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतला, तर कोरोनाच्या काळातही ग्रोथ रेट वाढण्यास मदत होईल.", असं ते म्हणाले. </p> <p style="text-align: justify;"><strong>दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर</strong></p> <p style="text-align: justify;">राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. </p> <p style="text-align: justify;">एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. </p> <p style="text-align: justify;">केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत. </p> <p style="text-align: justify;">'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.</p> <p style="text-align: justify;"><strong>एबीपी माझा युट्यूब लाईव्ह : <a href="https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M">https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M</a> </strong><br /><strong>फेसबुक पेज : <a href="https://ift.tt/3lS1jCN /><strong>ट्विटर हँडल : <a href="https://twitter.com/abpmajhatv">https://twitter.com/abpmajhatv</a> </strong></p>
from maharashtra https://ift.tt/2VMnXBm
https://ift.tt/eA8V8J
Home
maharashtra
Majha Maharashtra Majha Vision : मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन
https://ift.tt/eA8V8J
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१
Majha Maharashtra Majha Vision : मुंबई-पुण्यातलं ट्रॅफिक 50 टक्के कमी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं व्हिजन https://ift.tt/eA8V8J
Share this
Recommended
Disqus Comments
Blogger द्वारे प्रायोजित.
माझ्याबद्दल
फॉलोअर
Social Counter
Slider Widget
5/recent/slider
हा ब्लॉग शोधा
लेबल
Recent Posts
Tags
Comments
recentcomments
Featured Posts
Recent Posts
Recent in Sports